
Chinnaswamy Stadium Stampede: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) च्या विजयानंतर बंगळुरूमध्ये निघालेल्या विजयी मिरवणुकीला गालबोट लागले आहे. खेळाडूंच्या स्वागतासाठी चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर जमलेल्या गर्दीवर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. त्यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत आतापर्यंत तब्बल 11 लोकांना आपले प्राण गमवावे लागले. त्यानंतरही स्टेडियममध्ये कार्यक्रम सुरू ठेवत आरसीबी संघाने आपली संवेदनहीनता दाखवून दिली.
Chinnaswamy Stadium Stampede Updates
आरसीबी खेळाडूंच्या स्वागतासाठी दोन लाखांपेक्षा जास्त लोक चिन्नास्वामी स्टेडियम परिसरात जमा झाले होते. त्यांना पांघवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या सौम्य लाठीचार्जने चेंगराचेंगरीला सुरुवात झाली. त्यानंतर झालेल्या जवळपास 11 मृत व 25 पेक्षा जास्त जखमी चाहत्यांना नजीकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले. कर्नाटक सरकारतर्फे होणारा खेळाडूंचा स्वागत समारंभ यावेळी रद्द करण्यात आला.
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी या घटनेबाबत दिलगिरी व्यक्त करत, या कार्यक्रमासाठी सुरक्षा व्यवस्था चोख नसल्याची कबुली त्यांनी दिली. तर दुसरीकडे बीसीसीआयने या संपूर्ण प्रकरणातून हात झटकले आहेत. बीसीसीआय अथवा आयपीएल यांचा या घटनेची संबंध नसल्याचे आयपीएल चेअरमन अरुण धुमल यांनी स्पष्ट केले. बीसीसीआयने या रॅलीचे आयोजन केले नसल्याचे त्यांनी सांगितले.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
बातमी अपडेट होत आहे…
हे देखील वाचा: कोण आहेत RCB सोबत 18 वर्ष लॉयल राहिलेले Mane Kaka? ज्यांच्यासाठी टीमने थांबवला जल्लोष
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।