
Rohit Sharma On His Captaincy: ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेत भारतीय संघाला पराभूत व्हावे लागले. पाच सामन्यांच्या या मालिकेत भारताचा 3-1 असा पराभव झाला. त्यानंतर दौऱ्याची आढावा बैठक शनिवारी (11 जानेवारी) पार पडली. यामध्ये कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने महत्त्वपूर्ण वक्तव्य केल्याचे सांगितले जाते.
Rohit Sharma In BCCI Meeting
शनिवारी पार पडलेल्या या बैठकीला बीसीसीआयचे काही पदाधिकारी, कर्णधार रोहित शर्मा, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर व निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांनी हजेरी लावली होती. या बैठकीत ऑस्ट्रेलिया दौरा, चॅम्पियन ट्रॉफी व भारतीय क्रिकेट संघाचे भविष्य याबद्दल चर्चा झाल्याच्या सांगण्यात येतेय.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, रोहित शर्मा याने कर्णधार म्हणून आपल्या भविष्याबद्दल बीसीसीआयला स्पष्टता दिली आहे. रोहितने आणखी काही काळ आपण कर्णधार राहण्यास इच्छुक असल्याचे सांगितले. तोपर्यंत पुढचा योग्य कर्णधार शोधावा, असे त्याने सुचवले. त्यामुळे संघातील वातावरण सांघिक राहील, अशी भावना त्याने व्यक्त केली. रोहितच्या या कल्पनेला बीसीसीआय पदाधिकाऱ्यांनी दुजोरा दिल्याचे समजते.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
रोहित शर्मा यांच्यासाठी ऑस्ट्रेलिया दौरा अत्यंत निराशाजनक राहील. त्याला मालिकेतील तीन कसोटी सामन्यात केवळ 31 धावा करता आल्या. त्यानंतर मालिकेतील अखेरच्या सामन्यातून त्याने स्वतः माघार घेतली होती. त्यामुळे रोहित कर्णधारपद सोडणार असल्याच्या चर्चा सुरू झालेल्या. मात्र, सामन्यादरम्यान एका मुलाखतीत बोलताना त्याने मी अजून बराच वेळ खेळणार असल्याचे स्पष्ट केलेले. केवळ संघहितासाठी आपण हा सामना खेळत नसल्याचे त्याने म्हटले होते.
रोहित आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताचे नेतृत्व करेल. त्यानंतर जून महिन्यात होणाऱ्या इंग्लंड दौऱ्यात तो भारताचा कसोटी कर्णधार असेल का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
(Rohit Sharma In BCCI Meeting)
हे देखील वाचा- इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी Team India ची घोषणा, अनुभवी खेळाडूचे 15 महिन्यांनी पुनरागमन
Champions Trophy 2025 साठी न्यूझीलंड संघ जाहीर! दिग्गजांना डच्चू, तरूणांना संधी