
तारीख 25 जून 1983. भारतीय क्रिकेटच्या आजवरच्या गौरवशाली इतिहासातील सर्वात विलक्षण आणि अविस्मरणीय ठरलेला दिवस (1983 Cricket World Cup). द कपिल देवने (Kapil Dev) लॉर्ड्सच्या गॅलरीत (Lords Cricket Ground) ती वर्ल्डकपची झळाळती ट्रॉफी उचलली आणि भारतीय क्रिकेटच्या अभुतपूर्व अध्यायाचा नारळ फुटला. सर्वच देशवासीयांसाठी अत्याधिक आनंदाचा आणि ओसंडून वाहणाऱ्या उत्साहाचा हा दिवस. याच ऐतिहासिक दिवसाला आज 41 वर्ष पूर्ण होतायेत. कपिल देव यांच्या संघाने विश्वविजेते बनण्याचा तो पूर्ण प्रवास कसा केला, त्याचीच ही कहाणी.
(41 Years Of 1983 Cricket World Cup Triumph)
वर्ल्डकप सुरू व्हायच्या आधी भारतीय संघ देखील फक्त साखळी फेरी खेळायला जातोय, असे मनात ठरवून गेला होता. काही खेळाडूंनी तर आपल्या कुटुंबासह ट्रिपचा देखील प्लॅन केलेला. कारण, मागच्या दोन वर्ल्डकपमध्ये संघाने फक्त हजेरी लावायचं काम केलेलं. मात्र, जसा टीम इंडियाने इंग्लंडमध्ये पाय ठेवला तशी परिस्थिती बदलली. कॅप्टन कपिलने वर्ल्डकपआधीच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हणलेल्या ‘We Here To Win’ या वाक्याने कदाचित जादू केली असावी.
🗓️ #OnThisDay in 1983!
A historic victory & a landmark moment for Indian cricket 🫡#TeamIndia 🇮🇳 led by @therealkapildev, were crowned champions for the very first time as they clinched the World Cup title 🏆👏🏻 pic.twitter.com/BIW9g7K2zP
— BCCI (@BCCI) June 25, 2024
भारताच्या वर्ल्डकप प्रवासाची सुरुवातच चमत्कारासारखी झाली. कारण, 9 जून रोजी झालेल्या पहिल्याच सामन्यात दोन वेळची वर्ल्ड चॅम्पियन वेस्ट इंडिज भारतापुढे नतमस्तक झाली होती. हा संपूर्ण क्रिकेटजगतासाठी एक धक्का होता. दुसऱ्या सामन्यात त्यांनी झिम्बाब्वेला 5 विकेट्सने हरवले. या सलग दोन विजयाने भारताकडे सगळ्यांची नजर वळाली. संघाची चर्चा होऊ लागली. मात्र, वेळ बदलायला वेळ लागला नाही. मजबूत ऑस्ट्रेलियाने भारताला जोरदार धोबीपछाड दिला. त्यानंतर वेस्ट इंडिजने रिव्हर्स फिक्सचरमध्ये आधीच्या पराभवाचे उट्टे काढले. अचानक वक्त बदलला होता, जज्बात बदलले होते. कपिल्स डेविल्स दबावात आलेले.
भारताचे हे दोन पराभव इतर संघांच्या पथ्यावर पडलेले. कारण आता सेमी-फायनलची रेस रंगणार होती. दोन सामने जिंकून सुरुवात केलेल्या भारतालाही आपले अस्तित्व टिकवण्यासाठी, आता पुढच्या दोन्ही सामन्यात कोणत्याही परिस्थितीत विजय हवा होता. भारत आपला पुढचा सामना खेळणार होता झिम्बाब्वेविरुद्ध. हा सामना क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली गेला, भारतीय कर्णधार कपिल देवच्या अविश्वसनीय खेळीसाठी. संघ 5 बाद 17 अशा खराब स्थितीत असताना फलंदाजीला आलेल्या कपिलने न भूतो अशी बॅट फिरवली. त्याच्या 175 धावांच्या अजरामर खेळीने भारताला या सामन्यात विजय मिळवून दिला. ती खेळी भारतीय संघात नवसंजीवनीसारखी भिनली.
शेवटच्या साखळी सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया समोरासमोर उभे ठाकलेले. सेमी फायनलसाठी दोन्ही संघांना विजय अनिवार्य असतांना भारतीय संघाने कांगारूंची मस्ती जिरवली. भारतीय संघाला नेहमीच पाण्यात पाहणाऱ्या ऑस्ट्रेलियन्सना त्यांच्याच संघाचा माना खाली घालून जाताना पाहावे लागत होते. कोणालाही अपेक्षित नसताना, भारत सेमी-फायनलमध्ये दाखल झाला होता.
सेमी-फायनलमध्ये भारताची गाठ पडलेली इंग्लंडशी. यजमान म्हणून वेगळाच तोरा मिळवणाऱ्या इंग्लंडने ऑस्ट्रेलियासारखेच भारताला हलक्यात घेतले. सामन्याआधीच, इंग्लंडच्या विजयाची भविष्यवाणी केलेल्या सर्वांच्या थोबाडीत मारण्याचे काम टीम इंडियाने केले. भारतीय संघाने 6 विकेट्सने विजय मिळवला आणि साहेबांना त्यांच्याच देशात लोळवत दिमाखात फायनलमध्ये एंट्री केली.
भारत फायनलमध्ये पोहोचल्यावर मात्र अचानकपणे सगळ्यांचे डोळे उघडले. हा संघ काहीतरी ऐतिहासिक करून दाखवणार, असे कॉलम लिहिले गेले. जुन्या जाणत्या खेळाडूंनी चमत्काराची अपेक्षा ठेवली. दुसरीकडे एक मोठा गट असा देखील होता, ज्यांचं म्हणणं होतं की, वेस्ट इंडिज भारताला किरकोळीत मारणार. कॅरेबियन्सच्या वर्ल्डकपची हॅट्रिक होणारच आहे, फक्त औपचारिकता बाकी राहिलीये, असे अनेक जण बोलून गेले. तटस्थांनी ‘घोडा मैदान जवळ आहे’ म्हणून वेळ मारून नेली.
लॉर्ड्सवर 25 जू़नची सकाळ. निरभ्र आकाशात आणि कोवळ्या उन्हात मेगाफायनल सुरू झाली. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजी तोफखान्याने सुरुवात केली आणि भारताचा किल्ला ध्वस्त केला. अवघ्या 183 धावा कशाबशा भारताने पार केल्या. मैदानावर जमलेले अनेक भारतीय निराशेने माघारी परतले. इतकेच काय खेळाडूंच्या कुटुंबीयांनी देखील हॉटेलचा रस्ता पकडला. मात्र, कपिल देव ऍंड कंपनीने ठरवले होते, “जबतक तोडेंगे नही तबतक छोडेंगे नहीं”. स्लो पॉ’यजनसारखे काम करणाऱ्या भारतीय गोलंदाजांनी सातत्याने वेस्ट इंडिजच्या बॅटिंगचे बुरुज ढासळवणे सुरू केले. कोणाच्या ध्यानीमनीही नसताना भारताने फक्त 130 धावांत वेस्ट इंडिजला लोटांगण घालायला भाग पाडले. जिमी अमरनाथने मायकल होल्डिंगला एलबीडब्ल्यू केले अवघ्या काही क्षणात भारतीय प्रेक्षकांनी लॉर्ड्सचे मैदान भरले. भारत विश्वविजेता बनला होता.
लॉर्ड्सवर हजर असलेले प्रेक्षक तर अक्षरशः बेभान झालेले. पंजाबी ढोलांनी वातावरण एकदम देसी बनलेले. इकडे भारतात देखील या विश्वविजयाचा तुफान जल्लोष सुरू झालेला. पुढच्या अनेक पिढ्या ज्या विजयाकडे पाहून भारतातील मुले क्रिकेट खेळायला सुरुवात करणार होती, तो हा विजय होता. भविष्यात भारतीय क्रिकेट जगावर राज्य करणार याची ही पायाभरणी होती!!!
(Story Of Indias 1983 Cricket World Cup Triumph)
Your article helped me a lot, is there any more related content? Thanks! https://accounts.binance.info/en-IN/register-person?ref=UM6SMJM3
Thank you for your sharing. I am worried that I lack creative ideas. It is your article that makes me full of hope. Thank you. But, I have a question, can you help me?
Can you be more specific about the content of your article? After reading it, I still have some doubts. Hope you can help me.
I don’t think the title of your article matches the content lol. Just kidding, mainly because I had some doubts after reading the article.
Can you be more specific about the content of your article? After reading it, I still have some doubts. Hope you can help me.
Your article helped me a lot, is there any more related content? Thanks!
Thank you for your sharing. I am worried that I lack creative ideas. It is your article that makes me full of hope. Thank you. But, I have a question, can you help me?
With havin so much content and articles do you ever run into any problems of plagorism or copyright violation? My site has a lot of exclusive content I’ve either created myself or outsourced but it seems a lot of it is popping it up all over the internet without my authorization. Do you know any solutions to help prevent content from being stolen? I’d certainly appreciate it.
Your article helped me a lot, is there any more related content? Thanks!