Team India Victory Parade :- तब्बल 17 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर भारतीय संघाने टी20 विश्वचषक जिंकला. बार्बाडोस, वेस्ट इंडिज येथे अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी पराभूत करत भारतीय संघाने टी20 विश्वचषक (T20 World Cup 2024) उंचावला. भारतीय संघाच्या या घवघवीत यशाने क्रिकेटप्रेमींची छाती अभिमानाने फुगली आहे. गुरुवारी (04 जुलै) जगज्जेत्या भारतीय संघाची मुंबईच्या एनसीपीए, नरिमन पॉईंटपासून वानखेडे स्टेडियमपर्यंत भव्य मिरवणूक काढली जाणार आहे. या मिरवणुकीसाठी विशेष बसही सजवण्यात आली आहे. परंतु या बसवरुन राजकारण तापले आहे.
त्याचे झाले असे की, मुंबईमध्ये आज संध्याकाळी भारतीय संघाची भव्यदिव्य विजयी मिरवणूक निघणार आहे. यासाठी एक विशेष बस मुंबईत दाखल झाली आहे. पण या बसचे पासिंग हे गुजरातचे असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे विरोधकांनी सवाल उपस्थित केला आहे.
The bus has reached Marine Drive for Team India’s Victory Parade at 5 PM..#MarineDrive#VictoryParade#IndianCricketTeam pic.twitter.com/uRrRQUsoFk
— Anubhav Rai🇮🇳 (@iamAnu1346) July 4, 2024
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भारतीय संघाच्या मिरवणूक बसवरुन टीका करताना म्हटले, ‘बेस्टच्या ताफ्यात खुल्या ज्या बसेस आहेत त्या सगळ्या चांगल्या बसेस आहे. महाराष्ट्राचं सरकार गुजरात धार्जिणे आहे. त्यांना ते आका म्हणतात. भारतीय संघासाठी गुजरातमधून बस आणली आहे. याचा अर्थ महाराष्ट्राचे अपमान करण्याचा प्रयत्न आहे,’ असा घणाघात त्यांनी केला आहे.
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।