Breaking News

Pahalgam Attack नंतर BCCI चा मोठा निर्णय, IPL 2025 मध्ये आता…

PAHALGAM ATTACKA
Photo Courtesy: X

BCCI After Pahalgam Attack: मंगळवारी (22 एप्रिल) जम्मू काश्मीर येथील पहलगाम (Pahalgam Attack) येथे आतंकवादी हल्ला झाला. या भ्याड हल्ल्यात तब्बल 28 लोकांना आपले प्राण गमवावे लागले. या घटनेचा जगभरातून निषेध होत असताना, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 

BCCI Big Decision After Pahalgam Attack

पहलगाम येथे काही दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला. यामध्ये तब्बल 28 लोकांना गतप्राण व्हावे लागले. या घटनेचे भारत आणि संपूर्ण जगभरात पडसाद उमटताना दिसत आहेत. सध्या सुरू असलेल्या आयपीएल 2025 (IPL 2025) बाबतही आता बीसीसीआयने एक निर्णय घेतला आहे.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप 

बुधवारी (23 एप्रिल) हैदराबाद येथे होणाऱ्या सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स (SRHvMI) या सामन्यात सर्व खेळाडू काळ्या फिती बांधून मैदानात उतरतील. यासोबतच पंच देखील आपल्या दंडावर काळी‌ फित बांधतील. सामना सुरू होण्याआधी दोन्ही संघ व प्रेक्षक एक मिनिट स्तब्ध राहून मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करतील. तसेच, या सामन्यात चिअरलीडर्स मैदानावर नसतील. त्यासोबतच आजच्या सामन्या दरम्यान कोणतीही फटाक्यांची आतिषबाजी होणार नाही. बीसीसीआयने अधिकृतपणे याची घोषणा केलेली आहे.

(BCCI Big Decision After Pahalgam Attack)

हे देखील वाचा- BCCI Central Contracts जाहीर, 32 खेळाडूंवर बरसणार पैसा