Breaking News

SL vs IND: पावसाच्या व्यत्ययात टीम इंडियाचा शानदार विजय, मालिकाही घातली खिशात

sl vs indSL vs IND T20I: श्रीलंका आणि भारत (SL vs IND) यांच्या दरम्यानच्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसरा सामना रविवारी (28 जुलै) खेळला गेला. पल्लेकले येथे झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने डकवर्थ लुईस नियमानुसार 7 गडी राखून विजय मिळवला. यासह भारतीय संघाने मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे.

पहिल्यांदा फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर श्रीलंका संघासाठी पथुम निसंका याने पुन्हा एकदा आक्रमक सुरुवात दिली. त्याने 24 चेंडूवर 32 धावा केल्या. तर कुसल मेंडिस फक्त 10 धावा करू शकला. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या कुसल परेरा याने 34 चेंडूवर 53 धावांची खेळी केली. त्यानंतर कामिंदू मेंडिस याच्या 26 धावांव्यतिरिक्त कोणीही फारसे योगदान देऊ शकले नाही. त्यामुळे श्रीलंकेचा डाव 161 पर्यंतच जाऊ शकला. भारतीय संघासाठी रवी बिश्नोई याने सर्वाधिक तीन बळी मिळवले. त्या व्यतिरिक्त हार्दिक पंड्या, अक्षर पटेल व अर्शदीप सिंग यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.

भारतीय संघाचा डाव सुरू झाल्यानंतर पहिल्या षटकात पावसाने व्यत्यय आणला. त्यामुळे भारतीय संघाला 8 षटकात 78 धावांचे आव्हान मिळाले. संजू सॅमसन हा पहिल्याच चेंडूवर बाद झाल्याने भारतीय संघ दडपणात आला. मात्र, यशस्वी जयस्वाल व सूर्यकुमार यादव यांनी वेगवान फटकेबाजी करत संघाला अर्धशतकी मजल मारून दिली. सूर्यकुमारने 12 चेंडूत 26 धावांची खेळी केली. तर यशस्वी याने 15 चेंडूवर 30 धावा केल्या. अखेर हार्दिक पंड्या याने 9 चेंडूंवर नाबाद 22 धावा करत संघाला विजय मिळवून दिला. यासह भारतीय संघाने मालिकेत विजयी आघाडी मिळवली.

(SL vs IND India Beat SL By 7 Wickets DL Method)

माजी क्रिकेटपटूची Rohit Virat वर टीका! जयस्वालचे कौतुक करत म्हणाला, “ते दोघे…”