Breaking News

अखेर Kochi Tuskers Kerala कोर्टात जिंकली! BCCI ला इतक्या कोटींचा दणका, 2011 पासून…

KOCHI TUSKERS KERALA
Photo Courtesy: X

Kochi Tuskers Kerala Won Legal Battle Against BCCI: तब्बल 14 वर्षांपासून सुरू असलेल्या कोची टस्कर्स केरला विरुद्ध भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय यांच्यातील वादावर कोर्टाने मध्यस्थी केली आहे. बीसीसीआयने कोर्टात दाखल केलेल्या याचिकेला नाकारत, मुंबई हायकोर्टाने बीसीसीआयला आदेश दिले आहेत की, त्यांनी 538 कोटी रुपयांची रक्कम कोची टस्कर्स केरला यांना मध्यस्थी निवाडा म्हणून द्यावी.

Kochi Tuskers Kerala Won Legal Battle Against BCCI

कोची टस्कर्स केरला संघाने आयपीएल 2011 (IPL 2011) मध्ये सहभाग घेतला होता. मात्र, त्यानंतर बँक गॅरंटी जमा न केल्याने रॅंदेवूज स्पोर्ट्स आणि केसीपीएल यांच्या या संघाला स्पर्धेतून बाहेर करण्यात आले होते. अशा पद्धतीने करार रद्द करणे चुकीचे असल्याचे म्हणत रॅंदेवूज स्पोर्ट्स व केसीपीएल यांनी 2012 मध्ये बीसीसीआयला कोर्टात खेचले होते. तेव्हा कोर्टाने 2015 मध्ये निकाल देत बीसीसीआयला या दोन्ही पक्षांना 385 कोटीची भरपाई देण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्याला बीसीसीआयने उच्च न्यायालयात आव्हान दिलेले.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: या आहेत 2031 पर्यंतच्या ICC Tournaments! तिघांचे यजमानपद भारताकडे

Exit mobile version